बाबूजी धीरे चलना नही....
प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असतं असं आपण कायम ऐकत आलोय.त्यामुळे काल परवा शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जर निवडणुकीपूर्वी स्वगृही कॉंग्रेस मध्ये आले तर अचंबा वाटावं अस काहीच नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीची लढत रंगतदार आणि "राखीव" अशीच झाली होती.राष्ट्रीयपनात गुरफटलेल्या रामदास आठवलेंचा दोन्ही कॉंग्रेस वाल्यांनी मिळून "गेम" केला.त्यांनी केलेला गेम शेवटपर्यंत सध्या दासाचा "राम" झालेल्या आठवलेंना कळला नाही.
ज्यांनी जय भीम पेक्षा राम राम बरा असा जातीयवादी प्रचार केला,त्यांच्या सोबत आपलं जातीचं कार्ड वापरून वाकचौरे निवडून आले.साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक न लढलेला माणूस सरळ लोकसभेत जाऊन बसलेला सर्व नागरिकांनी पहिला.हा पराभव रामदास आठवलेंच्या जिव्हारी लागण स्वाभाविक होत.पण या सगळ्या घोडेबाजारात आणखी एक नाव होत ते म्हणजे प्रेमानंद रुपवते याचं!!
२००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रुपवते या शिर्डी मतदार संघात सक्रिय तर होतेच,परंतु कॉंग्रेस चे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे.त्यांचे वडील आद.दादासाहेब रुपवतेंच्या मुशीत वाढलेल्या यांची जडणघडण संपूर्ण काँग्रेसी वातावरणातच झाली.रिपब्लिकन चळवळ फुटण्यासाठी दादासाहेब रुपवतेंना टार्गेट केलं जात.या गोष्टीमध्ये तथ्य जरी असलं तरी, कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्याचं सगळ राजकारण हे आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन करणारंच होत.दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच दुखण समजून घेणारा नेता नगर जिल्ह्यात अजून तरी जन्माला आला नाही अस म्हणायला हरकत नसावी.मंत्रिमंडळात असताना दादासाहेबांनी केलेलं काम कुणी विसरू शकणार नाही.आणि जे विसरू पाहतील त्यांना कृतघ्न म्हणावं लागेल.त्यांचे विचार घेऊन प्रेमानंद रुपवते महाराष्ट्राच्या राजकारणात सामील झाले.फुले-आंबेडकरी विचारधारेचा तत्वचिंतक नेता म्हणून "बाबूजी" खेडोपाडी परिचित आहेत.त्यांच्या विचारांचा,ओघवत्या शैलीचा,लेखनाचा आणि विनोद बुद्धीचा चाहता वर्ग भरपूर आहे.अशा अष्टपैलू व्यक्तीकडे पाहिलं कि भारतीय राजकारण किती शालीन,कूलीन आणि सुसंस्कृत असू शकत याची प्रचीती येते.
२००९ निवडणुकीत शिर्डीची जागा आघाडी च्या कोट्यातून रामदास आठवलेंना सोडली गेली.हक्काची जागा गेल्यामुळे प्रेमानंद रुपवतेंनी (शमणारी अशी) बंडखोरी केली.त्यांच्या पदरी पडलेली सुमारे २३००० मते काही किमया दाखऊ शकले नाहीत.बंडखोरी केल्यानंतर विचारवंत,अभ्यासू नेता आपल्या हातून निसटू नये म्हणून त्यांना सन्मानाने पक्षात घेतलं गेल.बसप,शिवसेना यांची ऑफर असतानासुद्धा विचारांशी प्रतारणा करणे त्यांनी अमान्य केल.शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना बाबूजींना आपल्या गोटात सामील करण्यासाठी उत्सुक होती.परंतु तात्त्विक तडजोडीला भिक घालतील ते बाबूजी कुठले? परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल.हरलेले रामदास आठवले शिवसेनेसोबत युती करून खासदार झाले,भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना सोडून निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही कॉंग्रेस मध्ये परतले.अशाही परिस्थिती बाबूजी मात्र कॉंग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले.त्यांची कन्या उत्कर्षा युवक कॉंग्रेस मध्ये महत्वाची भूमिका बजावते आहे,युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी काम करण्याची तिला संधी मिळाली.हि गोष्ट बाजूला ठेवली तर बाबूजींच्या हाती नेमकं लागलं काय? हा प्रश्न तसाच कायम आहे.महाराष्ट्रातील राजकारणात कॉंग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या एकनाथ गायकवाड ,सुशीलकुमार शिंदे(आपल्या पुत्रींसह) यांना पक्षाने सन्मानाने वागणूक दिलेली आहे.मग फक्त प्रेमानंद रुपवातेंना का दुय्यम स्थान दिल जात हे कळत नाही.
मनात आणलं असत तर रिपब्लिकन रुपवते गट याअगोदरच स्थापन झाला असता.पण सामान्य नागरिकांची अशी अपेक्षा आहे कि बाबुजींनी , "राजकारण" करून आपली स्वतःची ताकद आजमावली तर हरकत नाही.भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत जाऊन खासदार होऊ शकतात मग रुपवते का नाही? "विनाशकाले विपरीत बुद्धी" झालेल्या कॉंग्रेस ने भाऊसाहेब वकचौरेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.या निवडणुकीत सुद्धा बाबूजींना डावलली जाण्याची दाट शक्यता आहे.जस अगोदर म्हटलं आहे कि प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असत त्याप्रमाणे वेगळा विचार करायला काहीही हरकत नाही.नवा प्रयोग जरूर करावा.केजरीवाल,मोदींच्या घोडेबाजारात मतदार सुद्धा सर्वसमावेशक अशा वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत.बाबूजी धीरे चलना....या गाण्यात गायिका बाबूजींना(रुपवते नव्हे) हळूहळू चालायला सांगते आहे,परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र बाबूजींना हळूहळू चलताना सिंहावलोकन करा असा सल्ला देत आहे.आता मात्र हि शेवटची संधी आहे बाबूजी धीरे चलना नही .....अभी नही तो कभी नही...!!
प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असतं असं आपण कायम ऐकत आलोय.त्यामुळे काल परवा शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जर निवडणुकीपूर्वी स्वगृही कॉंग्रेस मध्ये आले तर अचंबा वाटावं अस काहीच नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीची लढत रंगतदार आणि "राखीव" अशीच झाली होती.राष्ट्रीयपनात गुरफटलेल्या रामदास आठवलेंचा दोन्ही कॉंग्रेस वाल्यांनी मिळून "गेम" केला.त्यांनी केलेला गेम शेवटपर्यंत सध्या दासाचा "राम" झालेल्या आठवलेंना कळला नाही.
ज्यांनी जय भीम पेक्षा राम राम बरा असा जातीयवादी प्रचार केला,त्यांच्या सोबत आपलं जातीचं कार्ड वापरून वाकचौरे निवडून आले.साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक न लढलेला माणूस सरळ लोकसभेत जाऊन बसलेला सर्व नागरिकांनी पहिला.हा पराभव रामदास आठवलेंच्या जिव्हारी लागण स्वाभाविक होत.पण या सगळ्या घोडेबाजारात आणखी एक नाव होत ते म्हणजे प्रेमानंद रुपवते याचं!!
२००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रुपवते या शिर्डी मतदार संघात सक्रिय तर होतेच,परंतु कॉंग्रेस चे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे.त्यांचे वडील आद.दादासाहेब रुपवतेंच्या मुशीत वाढलेल्या यांची जडणघडण संपूर्ण काँग्रेसी वातावरणातच झाली.रिपब्लिकन चळवळ फुटण्यासाठी दादासाहेब रुपवतेंना टार्गेट केलं जात.या गोष्टीमध्ये तथ्य जरी असलं तरी, कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्याचं सगळ राजकारण हे आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन करणारंच होत.दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच दुखण समजून घेणारा नेता नगर जिल्ह्यात अजून तरी जन्माला आला नाही अस म्हणायला हरकत नसावी.मंत्रिमंडळात असताना दादासाहेबांनी केलेलं काम कुणी विसरू शकणार नाही.आणि जे विसरू पाहतील त्यांना कृतघ्न म्हणावं लागेल.त्यांचे विचार घेऊन प्रेमानंद रुपवते महाराष्ट्राच्या राजकारणात सामील झाले.फुले-आंबेडकरी विचारधारेचा तत्वचिंतक नेता म्हणून "बाबूजी" खेडोपाडी परिचित आहेत.त्यांच्या विचारांचा,ओघवत्या शैलीचा,लेखनाचा आणि विनोद बुद्धीचा चाहता वर्ग भरपूर आहे.अशा अष्टपैलू व्यक्तीकडे पाहिलं कि भारतीय राजकारण किती शालीन,कूलीन आणि सुसंस्कृत असू शकत याची प्रचीती येते.
२००९ निवडणुकीत शिर्डीची जागा आघाडी च्या कोट्यातून रामदास आठवलेंना सोडली गेली.हक्काची जागा गेल्यामुळे प्रेमानंद रुपवतेंनी (शमणारी अशी) बंडखोरी केली.त्यांच्या पदरी पडलेली सुमारे २३००० मते काही किमया दाखऊ शकले नाहीत.बंडखोरी केल्यानंतर विचारवंत,अभ्यासू नेता आपल्या हातून निसटू नये म्हणून त्यांना सन्मानाने पक्षात घेतलं गेल.बसप,शिवसेना यांची ऑफर असतानासुद्धा विचारांशी प्रतारणा करणे त्यांनी अमान्य केल.शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना बाबूजींना आपल्या गोटात सामील करण्यासाठी उत्सुक होती.परंतु तात्त्विक तडजोडीला भिक घालतील ते बाबूजी कुठले? परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल.हरलेले रामदास आठवले शिवसेनेसोबत युती करून खासदार झाले,भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना सोडून निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही कॉंग्रेस मध्ये परतले.अशाही परिस्थिती बाबूजी मात्र कॉंग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले.त्यांची कन्या उत्कर्षा युवक कॉंग्रेस मध्ये महत्वाची भूमिका बजावते आहे,युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी काम करण्याची तिला संधी मिळाली.हि गोष्ट बाजूला ठेवली तर बाबूजींच्या हाती नेमकं लागलं काय? हा प्रश्न तसाच कायम आहे.महाराष्ट्रातील राजकारणात कॉंग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या एकनाथ गायकवाड ,सुशीलकुमार शिंदे(आपल्या पुत्रींसह) यांना पक्षाने सन्मानाने वागणूक दिलेली आहे.मग फक्त प्रेमानंद रुपवातेंना का दुय्यम स्थान दिल जात हे कळत नाही.
मनात आणलं असत तर रिपब्लिकन रुपवते गट याअगोदरच स्थापन झाला असता.पण सामान्य नागरिकांची अशी अपेक्षा आहे कि बाबुजींनी , "राजकारण" करून आपली स्वतःची ताकद आजमावली तर हरकत नाही.भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत जाऊन खासदार होऊ शकतात मग रुपवते का नाही? "विनाशकाले विपरीत बुद्धी" झालेल्या कॉंग्रेस ने भाऊसाहेब वकचौरेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.या निवडणुकीत सुद्धा बाबूजींना डावलली जाण्याची दाट शक्यता आहे.जस अगोदर म्हटलं आहे कि प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असत त्याप्रमाणे वेगळा विचार करायला काहीही हरकत नाही.नवा प्रयोग जरूर करावा.केजरीवाल,मोदींच्या घोडेबाजारात मतदार सुद्धा सर्वसमावेशक अशा वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत.बाबूजी धीरे चलना....या गाण्यात गायिका बाबूजींना(रुपवते नव्हे) हळूहळू चालायला सांगते आहे,परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र बाबूजींना हळूहळू चलताना सिंहावलोकन करा असा सल्ला देत आहे.आता मात्र हि शेवटची संधी आहे बाबूजी धीरे चलना नही .....अभी नही तो कभी नही...!!

