भविष्य आपल्याला न्याहाळत आहे: नेहरूंचं भाषण

`अखंड भारताची (ब्रिटिश इंडिया) रक्तरंजित फाळणी झाल्यानंतर भारत (15 ऑगस्ट 1947) आणि पाकिस्तान (14 ऑगस्ट 1947) स्वतंत्र झाले. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान  पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल मोहम्मद  अली जीना यांनी आपापल्या देशाला मार्गदर्शन करणारी भाषणं केली.  नेहरूंचे 'नियतीशी करार' आणि जीनांचे 'पहिलं अध्यक्षीय मनोगत' ही भाषणं गाजली. दोन्ही देशांनी  कोणत्या दिशेने  वाटचाल करावी, हे सुचवणारी ही भाषणं 'जग बदलवणाऱ्या  भाषणांच्या' मालिकेत , स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने....

भविष्य आपल्याला न्याहाळत आहे
 पं. जवाहरलाल नेहरू



पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार वेत्र्ला होता, आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बर्याच अंशी प्रत्यक्षात आणण्याचा आज क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा सगळे जग झोपले आहे, तेव्हा भारत जागा होतोय; त्याच्या जीवनाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति!

इतिहासात क्वचितच  येणार्या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन् वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहूनही महान अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ, अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.
इतिहासाच्या उषःकालात भारताने आपला न संपणारा शोध सुरू वेत्र्ला. शतकानुशतके  अविरत संघर्ष करून अन् जयापजयाचे डोंगर पार करून! चांगल्या वाईट शक्तींशी भारताने सामना केला परंतु भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले  त्यांना भारत विसरला देखील  नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एका स्वत्वाची जाणीव होते आहे.

आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही आपली वाट पाहणार्या विजयश्रीच्या प्रसादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे काय?
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारी देखील  येत असते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या या घटनासमितीवर ही फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी आपण काही प्रसववेदना सहन केल्या आहेत; त्यातील दुःखद  आठवणींनी आपले अंतःकरण भरलेले आहे; त्यातील काही वेदनांचा  सल अजूनही आपण अनुभवीत आहोत. असो, भूतकाळ संपला आहे अन् भविष्यकाळ आता आपल्यासमोर उभा आहे.

हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामायक नक्कीच नाही. अविरत आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेतून आपण वेळोवेळी एक प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा आज आपण पूर्ण करण्यास जातो आहोत. ती प्रतिज्ञा म्हणजे, भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई  यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे निर्मूलन करणे होय. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे, अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्त्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलीडचे असेल; परंतु जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.
आणि म्हणूनच आपण हे सगळे सोसले पाहिजे, त्याच्या निराकरणासाठी काम केले पाहिजे, असले दुःख नष्ट व्हावे म्हणून कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली ही स्वप्ने साकार होऊ शकतील. ही भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, जगातील सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी इतका जोडला गेला आहे की एकमेकांच्या सहकार्याशिवाय त्याला जगणे अशक्य  आहे. ज्याप्रमाणे शांतता ही विभागता येत नाही; स्वातंत्र्य विभागता येत नाही, त्याचप्रमाणे आता वैभवसंपन्नाता आणि जगातील सर्वनाशही विभागता येणार नाही. तेव्हा आता फार काळ इतरांपासून वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही. जे काही असेल ते सर्वांचे असेल.

ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठीशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे राहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि फुटकळ टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुसऱ्यावर दोषारोप  करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रसादाची  उभारणी आपण केली  पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असे निर्णय घेतले जावेत

1. मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी  अशी शपथ घ्यावी  की  'तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वतःस अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एका प्राप्त करून देण्यासाठी  त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्घ आहे.'
2. जे सदस्य  यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील; त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी.

Reference: Constituent Assembly Debates.
अनुवा : सागर भालेराव
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016

संविधान सभेतील मोहम्मद अली जिनांचं भाषण

           


हिंदू समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू  समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात.

न्याय, सकारात्मकता ही आपली तत्त्वं
 कायदे आजम मोहम्मद अली जीना.



आपण मला दिलेल्या आदर  सत्काराबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. घटना समितीने माझी प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली  गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कौतुकाचे बोल काढले आहेत, त्यांचादेखील मी आभारी आहे. मला प्रखर आशावाद आहे की, आपल्या सर्वांच्या अनुमतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही घटना समिती संपूर्ण जगासाठी एक उत्तम उाहरण ठरेल. घटना समितीला महत्त्वाची दोन  कामे प्रामुख्याने करायची आहेत. प्रथम अग्रणी  असलेले काम म्हणजे पाकिस्तान देशासाठी संविधाननिर्मिती आणि दुसरे काम म्हणजे पाकिस्तान संघराज्याचे प्रशासन व्यवस्थितपणे चालवण्याचे काम. पाकिस्तान संघराज्याचे संविधान बनविताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हांला ही गोष्ट माहीत पाहिजे की, एकाच द्वीपखंडातील दोन देश  एकमेकांपासून विभक्त होत आहेत. आपणच नाही तर संपूर्ण जग या घटनेकडे कुतूहलाने, आश्चर्याने बघत आहे. ही एकमेवाद्वितीय घटना आहे. जगात कुठेही आजवर घडली नसेल अशी ही घटना आहे. मुख्य म्हणजे क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण शांततेने हे मिळविले आहे. संविधाननिर्मितीच्या बाबतीत काय काय केले  पाहिजे याबद्दल या ठिकाणी मी काही भाष्य करणार नाही, परंतु हे सांगू इच्छितो की, तुम्ही सर्व एका सार्वभौम देशाच्या वैधानिक व्यवस्थेचा भाग आहात, तुम्हांला या वैधानिक व्यवस्थेने काही अधिकार दिलेले  आहेत. त्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्याल व कसे घ्याल हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याबाबतीत जबाबदारीने वागावे लागणार आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. एका मुद्द्यावर आपण सगळे सहमत असलो पाहिजे की,देशात कायदा  व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन, मालमत्ता, धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आपले आदिम कर्तव्य असायला हवे.

दुसरी एक गोष्ट आपणांस सांगू इच्छितो की, सध्या अखंड भारत देश  एका भयंकर शापाने प्रभावित आहे. तो शाप म्हणजे लाचखोरी आणि भ्रष्टाचार होय. इतर देशांना  हा शाप नाही असे नाही. परंतु आपली स्थिती इतर देशांपासून फारच बिकट आहे. लाचखोरी व भ्रष्टाचार हे विष आहे. त्यांच्याशी आपल्याला दोन  हात करावे लागतील. मला आशा आहे की, आपण सगळे या विषयाची गांभीर्याने दखल घ्याल आणि या विषाचे आपल्या देशातून उच्चाटन कराल.

काळा बाजार हा आणखी एक शाप आहे. आपल्याला माहीत आहे की काळा बाजार करणारे लोक फार कमी प्रमाणात पकडले जातात आणि त्यांना शिक्षा केली  जाते. काळा बाजार हा भयंकर राक्षस असून, आपल्या समाजात तो हैदोस घालतो आहे. त्यामुळे आपल्याला अन्नाधान्याच्या टंचाईला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घेत, कठोरातले कठोर कायदे आपण बनवले पाहिजे.

पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी वारसाने मिळालेल्या आहेत. जशा चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत तशा वाईट गोष्टीे देखील आपल्याला वारशाने मिळालेल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे नोकरशाही आणि तिचा भ्रष्ट कारभार. याठिकाणी मला हे प्रकर्षाने अधोरेखित करायचे आहे की, नोकरशाहीचा मनमानी कारभार मी खपवून घेणार नाही. जिथे कुठे  मला असे चित्र दिसेल  तिथे मी कडक कारवाई केल्यावाचून  राहणार नाही.

मला माहीत आहे की काही लोक फाळणीबद्दल, पंजाब आणि बंगालच्या विभाजनाबद्दल खूश नाहीत. बर्याच लोकांनी आपली नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. परंतु आता जी परिस्थिती आपल्यासमोर आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. मी मागे म्हटल्याप्रमाणे एकाच द्वीपखंडातील भूभागाची ही फाळणी न भूतो न भविष्यती अशीच आहे. काही लोकांना हेखील आवडलेले नाही की एकाच समुदायातील दोन  घटक वेगळेवेगळे झालेले आहेत. जिथे एक समाज बहुसंख्य आहे तर दुसरा अल्पसंख्याक आहे.

अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांना घेऊन काम करता येईल की नाही हा प्रश्न लोकांकडून फाळणीच्या अगोदर  विचारला जात होता. आता फाळणी झालेली आहे, आपण विभक्त झालेलो आहोत. मागचे सोडून देत  आपण ती परिस्थिती स्वीकारायला हवी. मला पूर्ण खात्री आहे की, येणार्या काळात आपण घेतलेला निर्णय फायद्याचा  ठरणार आहे. अखंड भारताची संकल्पना कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. अखंड भारताची संकल्पना ही विनाशाकडे नेणारी संकल्पना आहे. या संकल्पनेचे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. सोबत एकाच देशात एक समाज प्रभावशाली असणं आणि दुसरा  समाज अल्पसंख्याक असणं हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आपण फाळणीचा विचार केलेला  होता, तो आता पूर्ण झालेला आहे. पाकिस्तानचे हे विशाल साम्राज्य जर आपल्याला सुखी व समाधानी ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित  करावे लागेल. मुख्यत्वेकरून गरीब जनतेकडे लक्ष दिले पाहिजे. आपण सहकार्याने काम केले , भूतकाळाकडे दुर्लक्ष केले  तर आपल्याला विजय नक्की मिळेल. आपल्याला आपला भूतकाळ विसरून काम करायचे आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो उत्साह असला पाहिजे. तेव्हा व्यक्ती कुठल्या  धर्माची आहे, जातीची आहे, रंगाची आहे हे न पाहता आपण काम केले पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार, असणार आहे. असे असले तरच आपण विकास करू शकू.

हिंदू  समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात. हे सगळं संपायला हवं, संपेलही. कोणी म्हणेल की, या व्यवस्थेमुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यात अडथळा आला, म्हणून आपण देखील  या सगळ्या गोष्टी फार अगोदरच सोडायला हव्या होत्या.

फार काळ कोणी तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकत नाही. 40 करोड लोकसंख्या असलेल्या देशावर  तर नाहीच नाही. आपण पारतंत्र्यात होतो तरी फार काळ आपण त्यांच्या गुलामगिरीत राहू शकलो नाही. आपण यापासून योग्य तो धडा घ्यायला हवा. तुम्ही आता मुक्त आहात. तुमच्या मंदिरांमध्ये  जाण्यास तुम्ही मुक्त आहात. तुमच्या मशिदींमध्ये जाण्यास तुम्ही मुक्त आहात. या पाकिस्तानात हवे तेथे आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे तुम्हांला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुठल्याही वंशाचे असाल किंवा  धर्माचे असाल, तुमच्या स्वातंत्र्यात अधिकारात पाकिस्तानचे सरकार ढवळाढवळ करणार नाही.

तुम्हाला माहिती असेल की, इतिहासात नोंद आढळते की सध्याच्या भारताची परिस्थिती बघता इंग्लंडची परिस्थिती त्याहून दयनीय  होती. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचे दोन  मुख्य पंथ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. आतासुद्धा इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक  यांच्यात भेदभाव राखला जातो. ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की अशा विषमतेच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. आपण सुरुवात केली आहे, जिथे समानता आहे, जिथे धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, वर्णाच्या आधारावर कुठेही विषम वागणूक दिली जात नाही. सर्व नागरिक समान आहेत या तत्त्वावर आपण आपल्या देशाची  उभारणी करत आहोत. रोमन कॅथलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील वादविवाद  मिटवण्यासाठी इंग्लंड सरकारला बराच कालावधी लागला. अनुभवातून हा देश  शिकला व सध्या सर्वांना समान हक्क, समान नागरिकत्व इंग्लंडमध्ये दिले जाते. प्रोटेस्टंट असो किंवा  रोमन कॅथलिक सर्व पंथाचे लोक तेथील नागरिक आहेत. मला वाटते आपण हा आदर्श  घ्यायला हवा. या देशातील  मुस्लीम हे मुस्लीम म्हणून ओळखले जावेत,हिंदू हे हिंदू  म्हणून ओळखले जावेत, केवळ धार्मिक कारणासाठी नाही तर ते या देशाचे नागरिक आहेत व आपले धार्मिक आचरणाचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे सांगण्यासाठी आपण तसे केले पाहिजे. असो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला दिलेल्या  मानाबद्दल, गौरवाबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो. मी कायम न्यायाला आणि सकारात्मकतेला आपले तत्त्व मानले आहे.

मी सुचवलेली मार्गर्शक तत्त्वे न्यायाच्या बाजूने आणि अन्यायाच्या विरोधात असतील असे मी ठामपणे सांगू इच्छितो. तुम्हां सर्वांच्या सहकार्याने व आधाराने पाकिस्तानला आपण जगातला एक महान देश बनवून दाखवू , असा विश्वास मी व्यक्त करतो.
धन्यवाद!

Reference: Constituent Assembly Debates.
अनुवाद  : सागर भालेराव
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016