शांती कि कोई एहमियत?






माननीय कैलाश सत्यार्थी.
शांती नोबेल पुरस्कार विजेता,
भारत.

शत शत प्रणाम!

बहुत  दिनो बाद आज आपकी याद आयी है | मौका भी तो वैसा है | गये कुछ दिनो से भारतवर्ष में जो कुछ हो रहा है उस बीच आप कही भी नजर नही आये,सोचा चलो आपको तो याद आती नही तो  क्यू ना हम हि आपसे बात कर ले| बहुत दिनो बाद अपने देश को आपके रूप पे नोबेल अवार्ड मिला,और वो भी 'शांती' नोबेल अवार्ड| पुरे दुनिया को शांतीके मार्ग से कैसे जिता जा सकता है ये आपने दिखा दिया| जब पुरा देश गोमांस के बनावट काली करतुद से दुनिया में बदनाम हो रहा है, तब आप कही दिखाई नही दे रहे| अखलाक अहमद को पिटपिट के मारा दीया गया ,इसके बाद अपने  देश के जागृत साहीत्यकारोने उन्हे नवाजे गये पुरस्कारोको वापस करते हुए देश कि अखंडता के खिलाफ काम करने वाली फासिस्त शक्ती को जोरदार तमाचा दिया | इस बीच भी आप कही नही दिखे|  कल फरीदाबाद में एक दलित परिवार के घर को जला दिया गया, इस बीच में दो मासूम बच्चो कि मौत हो गयी, आप तो बच्चो के लिये काम करते हो, इस बीच भी आप कही नही दिखे| शायद, दलित बच्चे आपके सो कोल्ड 'बचपन बचाव आंदोलन' का हिस्सा नही है, इसीलिये उनका बचपन जातीवाद के आंग में जलता रहा, तब भी आप कही नही दिखे| अगर आप भूल गये हो तो याद दिलाता हुं, आपके साथ पाकिस्तान कि मलाला युसुफजाई को भी शांती का नोबेल अवार्ड मिला, जो देश अपने स्थापना से कभी भी एकदिल से रेह नही पाये, उन दो देशो को साथसाथ नोबेल पुरस्कार मिलना आश्चर्य  कि बात थी| तब शायद लगा कि अब दोनो देशो के बीच शांतता प्रक्रिया अब आग बढेगी| पर जब गुलाम अली खान साहब के संगीत समारोह को शिवसेना नामक कोई उग्रवादी संघटन विरोध कर रहा था, तब भी आप कही नही दिखे| डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी जैसे प्रोग्रेसिव विचारधारा के लोगो कि दिनदहाडे बंदूक कि गोलीसे हत्या हो रही थी, लोग सडको पे उतरकर विरोध कर रहे थे, तब भी आप कही दिखाई नही दिये|

 गये साल मुंबई में हुई  इंडियन सायन्स कॉंग्रेस में पत्रकार परिषद में मैने आपको सवाल किया था, कि क्या अब पाकिस्तान और भारत को नोबेल मिलने के बाद दोनो देशो में शांतिवार्ता होगी? तब आपने बडे चालाखी से जवाब दिया था कि, में मलाला को अपनी बेटी मानता हुं| कोई पिता और कोई बेटी सीमापर  बैठकर अगर शांतिवार्ता होती तो सब सवाल खतम हो जाते| चलो दो देशो के बीच में अमन कि बात चलाना ये मुश्किल बात हो सकती है,पर अपने देश का क्या? नोबेल पुरस्कार लेने के बाद दिये हुए भाषण में आपने  वेदो में लिखी हुई कुछ पंक्तीया सुनाई,और अपना देश कितना सहिष्णू है इसका दाखिला दिया| अपना देश गांधी और बुद्ध कि भूमी है ऐसा भी  आपने कहा, पर जब खुले आम मानवता कि हत्या हो रही है, गांधीजी के खुनी को देशभक्त कहा जा रहा है, तब आप कहा हो? आपको हालही में 'जागतिक मानवियता पुरस्कार' से  हार्वर्ड विश्वविद्यालय ने सम्मानित किया,सून कर बडा हर्ष हुवा| लेकिन जब आपको मानवियता पुरस्कार मिल रहा था तब अपने देश के अल्पसंख्यांक मुस्लिम और दलित लोग हिंदुत्ववादी संघटन के अमानवीय कृत्योसे लड रहे थे| शायद इससे आप गुमराह होगे, आपने ये बात नजरंदाज कि ऐसा हम नही कहेंगे|

ये सब बताने का कष्ट कर रहा हुं क्योकी अपने देश में शांतता का नोबेल पुरस्कार प्राप्त आदमी है ये लोग भूल गये है , और शायद लोगो के साथ आप भी ये महत्वपूर्ण बात भूल गये हो | यही बात आपको याद दिलानी थी,बाकी कुछ नही| देखिये, वक्त मिल जाये तो अपने देश में हो रहे अमानवी कृत्यो के बारे में भी बात करे| नही तो आनेवाले वक़्त मै 'शांती' कि कोई एहमियत नही रहेगी|

शांती- अमन का चहिता और भारत देश का एक नागरिक
सागर 

पद्मश्री आर.के. लक्ष्मण



चित्रकला हा सगळ्या बाल गोपाळांचा आवडीचा विषय असतो.लहानपणी "छंद" म्हणून जरी हा विषय हाताळत असले तरी फारच कमी लोक व्यवसाय म्हणून या कलेकडे बघत असतात.आणि त्यातल्या त्यात फार कमीच लोक त्यात प्रसिद्धीस पावतात.चित्रकलेतला अर्कचित्र,व्यंगचित्र हा तर सगळ्यांच्याच आवडीचा,निवडीचा आणि आकर्षणाचा विषय.पण केवळ काळ्या रेषेतून पांढऱ्या कागदावर रेघोट्या ओढण्याईतक हे सोप काम नाही.भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि राजकारणाने बरबटलेल्या देशात व्यंग शोधायला पुरेपूर वाव आहे. शोधाल तिथे विषय आणि बघाल तिथे आशय असा हा देश कलाकार मन असलेल्या व्यक्तींना नक्कीच भावला आहे.आपल्या व्यंगचित्रात तोचतोचपणा येऊ नये यासाठी फार कमी लोक मेहेनत घेत असतात ,आणि अशा काही मोजक्या चित्रकारांमध्ये शिरोमणी कोणी असतील तर ते आहेत आर.के.लक्ष्मण. 
     रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मस।  ।    


मधुन न  पूर्ण नाव.जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदी पर्यंत पंतप्रधानांची राजकीय कारकीर्द बघितलेला हा प्रगल्भ माणूस.राजकीय चित्रकार म्हणून ते संपूर्ण भारतवर्षाला माहित आहेत.भारतामध्ये तरी दीर्घकाळ व्यंगचित्रकार काढणारे एकमेव कलाकार म्हणून त्यांची ओळख नाकारता येणार नाही.लोकशाहीवादी भारतात खर तर  व्यंगचित्रकाराला येथील सगळेच पुढारी विषय देत आले आहेत.परंतु हे विषय कळणे,त्यावर समूळ  विश्लेषण व्हाव, वाचकांना चुटकीसरशी आकलन होईल अस व्यंगचित्र काढण हे महाकठीण काम पार पाडण्यात आर.के.लक्ष्मण यांचा नेहमीच हातखंडा होता.विषयाची वस्तुनिष्ठता तपासून त्यावर यथायोग्य भाष्य करणे हे येरागबाळ्याचे काम नक्कीच नाही.त्यामुळे तर देशात आणीबाणी लागू असतानाही तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण यांना राजकीय व्यंगचित्रे काढण्याची अनुमती दिली, आणि अशी व्यंगचित्रे लोकशाहीला अधिकच परिपक्व करतील असा शेराही दिला.केवळ या प्रसंगावरून लक्ष्मण यांची प्रगल्भता लक्षात यावी.जे.जे.आर्ट्स स्कूल म्हणजे कलाविषयक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठ.या कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा आणि आपले चित्रकार होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लक्ष्मण  यांनी देखील अर्ज केला होता आणि सोबत नियमाप्रमाणे आपल्या अर्कचित्रांचे  काही नमुने कॉलेजकडे पाठविले होते.काही दिवसांनी कॉलेजकडून उत्तर आले कि,तुमची चित्रकला हि परिपूर्ण नाही आणि तुम्ही आमच्या शिक्षणसंस्थेत कलेचे शिक्षण घेण्यास अपात्र आहात. उपरोक्त सबबीवर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने लक्ष्मण यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता.देशातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून लक्ष्मण निराश झाले नाही.उलट आणखी उत्साहाने आपली "पात्रता" दाखवून देण्यासाठी आपली कलासेवा सुरु ठेवली.पुढे कालांतराने "टाइम्स" मध्ये कार्यरत झाल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळाली .योगायोगाने टाइम्सचे कार्यालय आणि जे.जे. ची इमारत शेजारी शेजारी होती. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांना एव्हाना प्रसिद्धी मिळाली होती; त्याच बळावर आणि कौतुकामुळे ज्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सने लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला त्यांनीच लक्ष्मण  यांना स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले.अशा हरहुन्नरी कलाकाराला चार भिंतीत घडविण्यापेक्षा चार लोकांमध्ये घडविण्याचा नियतीचा विचार असावा. अशी फार कमी कर्तुत्ववान माणसे  असतात त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मण.
      "यु सेड इट" या नावाने टाइम्स मध्ये येणारे व्यंगचित्राचे सदर लक्ष्मण यांच्या विशेष शैलीमुळे अतिशय लोकप्रिय ठरले.विविध भाषा,प्रांत,चालीरीती,वेशभूषा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक राजकीय निर्णयाचा,घडामोडीचा बाधक हा इथला 'सामान्य' नागरिक असतो.या सगळ्या विविध गोष्टी दाखविण्यापेक्षा संपूर्ण देशाची ओळख असणार एकच पात्र असावं अशी भन्नाट कल्पना लक्ष्मण यांच्या सुपीक डोक्यात आली.आणि यातून साकारला गेला तो डोक्याला टक्कल असलेला,मिशा असलेला,उभ्या आडव्या चौकटीचा कोट घातलेला आणि धोतर नेसलेला,खांद्यावर काठी आणि काठीला अडकवलेल गाठोड घेऊन निघालेला "कॉमन मैन. अल्पावधीतच हा कॉमन मैन देशातील प्रत्येक जनसामान्याचा  प्रतिनिधी बनला.हा सामान्य माणूस कधी अर्कचित्रातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावायचा तर कधी पुराची पाहणी करायला निघालेल्या मंत्र्याच्या हैलिकाप्टर पाहणी करायला जायचा.कधी सीमेवर युद्ध बघायला जायचा तर कधी राजनेत्याच्या प्रचारसभेत अगदी स्टेजवर जाऊन बसायचा.काहीही न बोलता प्रतिक्रिया देणारा हा कॉमन म्यान मग अल्पावधीत मूकनायक बनला.त्याची निर्मिती करणारे लक्ष्मण मग भारतीय राजकारणातल डोळस व्यंग शोधून त्यावर भाष्य करू लागले.
       सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री आर.के. नारायण हे लक्ष्मण यांचे ज्येष्ठ बंधू.त्यांनी साकारलेल्या मालगुडी डेज या कथासंग्रहात असलेल्या काल्पनिक 'मालगुडी' या गावाला जिवंतपणा देणारी व्यंगचित्रे लक्ष्मण यांनी काढली.८० च्या दशकात दूरदर्शनवर झळकणारी मालगुडी डेज हि मालिका अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनावर गरुड गाजवत आहेत.असे कलाकार पुन्हा होणे नाही.कलेच्या क्षेत्रात आपल जीवन समर्पित करून त्या कलेच व्रत हाती घेणारे लक्ष्मण हे अनन्य साधारण असे व्यक्तिमत्व होते.९३ वर्षे वय असूनही कालाशक्ती जागरूक असलेले लक्ष्मण बुद्धीने तल्लख होते.आपले शरीर थकले असले तरी मेंदू थकलेला नाही असे ते नेहमी म्हणायचे.त्यांच्याच तोडीचे चित्रकार  एम.एफ. हुसैन यांना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या  हल्ल्यामुळे जेव्हा देश सोडून जावा लागला तेव्हा हा  कलाकार देखील अस्वस्थ झालेला या देशाने पाहिलेला होता.अलीकडेच 'चार्ली हेब्डो' वर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला गेला.कलाकाराला जात धर्म आणि पंथ नसतो.नवरचनावादाचा पुरस्कार करणारे कलाकार विवेकवादी असतात.हाच विवेक लक्ष्मण यांनी आयुष्यभर जपला.लक्ष्मण हे आपल समृध्द जीवन जगले.किती तरी सरकारे लक्ष्मण यांच्या साक्षीने घडली आणि बिघडली.अशा अनेक सूक्ष्म घडामोडींचे साक्षीदार असलेले लक्ष्मण आपल्यात आज नसले तरी त्यांच्या हाताने रेखाटलेल्या रेघोट्या आपल्या भावी पिढीवर संस्कार करणाऱ्या आहेत.लक्ष्मण आपल्यातून गेले असले तरी  त्यांचा  कॉमन म्यान अजूनही आपल्या आसपास आहे.इथल्या प्रत्येक घडामोडीवर तो लक्ष ठेवून आहे.जिथे आपण चुकणार आहोत तिथे तो त्याच्या हातातील काठी आपल्या माथी मारणार आहे.या कॉमनमॅनचा वचक जो पर्यंत या व्यवस्थेवर आहे तोवर 'सामान्य' माणूस निश्चिंत आहे.

राजकारण नव्हे माजकारण. सहाजिक!

 


              प्रचलित परंपरेतील  धर्म सोडण, प्रांत सोडण अगदी सोप असत पण संस्कृती सोडण हे मात्र अतिअवघड. अशक्यातील अशक्य गोष्ट म्हणजे संस्कृतीला तिलांजली देण. हीच संस्कृती कधी समृध्द अडगळ बनते तर कधी बाजारबसवी झालेली गोलपिठाच्या वस्तीत पाहायला मिळते, कधी लाहोरच्या मुशायरामध्ये तत्वज्ञान सांगताना आढळते तर कधी सिंध प्रांतातील लारकानामध्ये उर्दू गझल ऐकताना सापडते. सहाजिकच.संस्कृती ही अशी हजारो वारसांच्या आणि वर्षांच्या नेणीवेतून आलेली उत्पत्ती असते, ती एका रात्रीतून टाकून देता येत नाही. जाणीव थंडावल्या असल्या तरी ज्यांच्या नेणीवा शाबूत आहेत अशा लोकांना शिवसेना नामक  माजकारणी पक्षाने गुलाम अली साहेबांच्या गझल कार्यक्रमाला केलेल्या विरोधाचे आणि तो कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकल्यावर नक्कीच असहाय्य वाटले असणार.सहाजिकच. जेव्हा जीवनावश्यक गोष्टी मिळाल्यावर मानवी जीवन स्थिरस्थावर झाले तेव्हा उद्योगी मेंदूला कला आणि सर्जनशीलता सुचली. त्यातून मग संगीत,नाट्य आदी सर्जनशील कलाकृतींची निर्मिती झाली. हे सगळ घडायला लाखो वर्षे लागली, आणि मानवी बुद्धीची वैचारिक जडणघडण त्यायोगे होत गेली. ही झाली सृजनशीलता ज्यातून सुजाण नागरिक घडेल आणि समाजकारणात आपला सहभाग देईल असे अपेक्षित होते.सहाजिकच.

परंतु हाच मानव अतिहुशार झाल्यावर धर्म नामक अफूच्या गोळीचा मुरीद बनला, वेदांआधी माणूस होता हे तो  विसरलो आणि हळूहळू धर्म-जात-पंथ याच्या आक्राळविक्राळ  भिंती उभ्या राहिल्या.माणूस मग धर्माच्या नावावर विखुरला गेला आणि कधी इस्लामिक राष्ट्र तर कधी हिंदुराष्ट्राची सनातनी मागणी करू लागला ते सुद्धा सहाजिकच. त्यांच्या रडारवर मग कधी आतिफ असलम, कधी आबेदा परवीन तर कधी गुलाम अली साहेब राहिले. राजकीय संघर्षाच्या वांग्यावरच तेल मग सांस्कृतिक संघर्षावर येऊ लागल. नकळत आपण इतके कट्टर बनलो की अनेक विषयांची सरमिसळ करत नवा सांस्कृतिक दहशवाद निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. गाणे गाणारी मंडळी चालतील पण विचार  गाणारे लोक नको म्हणून इथल्या विद्रोही कवींना आणि लेखकांना जीवे मारण्याचे फतवे काढले गेले. या प्रत्येक गोष्टीमागे राजकारण आणि त्यायोगे आलेलं हिंसावादी प्रदर्शन होत हे विसरता येणार नाही, सहाजिकच.

हे कट्टरतावादी लोक जेव्हा  गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीच्या मंदिरावरून अखलाकला मारण्याची आरोळी देत होते तेव्हा गप्प होते, घरात शिरून त्याच्या कुटुंबाला मारहाण केली जात होती आणि एक जीव घेतला जात होता  तेव्हा देखील हे चूप होते. त्यांनी ना निदर्शने केली ना संताप व्यक्त केला. सहाजिकच.जेथे माणुसकी गायली जात नाही तेथे कलाकार काय गातील? गुलाम अली साहेब जेव्हा गाण गात असतात तेव्हा ते कुठल्या धर्माचे, देशाचे नसतात त्यांच्या गाण्यातून मिळणारा स्वर्गानंद देखील कुठल्या पंथाचा नसतो, बुरसटलेले लोक त्याला आपल्या अविचारी डोक्याने भगवा किंवा हिरवा रंग देत असतात . कारण रंग देखील तुमच्या आमच्या नेणीवेतून आलेला असतो, तेव्हा त्याच भावनिक भांडवल करण हे त्या माजकारणी लोकांना सहजशक्य असत, कारण आम्ही प्रचंड  भावनिक आणि धर्माभिमानी असतो.सहाजिकच. सुरक्षेत्र नामक एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये ज्युरी म्हणून पाकिस्तानी गायक आहेत म्हणून खाज ठाकरे नामक अशाच एका माजकारणी माणसाने या कार्यक्रमाला विरोध केला होता आणि त्यावेळी एक कलाकार म्हणून खाज ठाकरेला उत्तर स्वतः आशा भोसले यांनी दिले होते. तेव्हा असे थिल्लर आंदोलन करून प्रसिद्धीच्या झोकात राहण्याही खानदानी परंपरा शिवसेना जपते आहे.बाकी काही नाही. पाकिस्तानी क्रिकेटर आणि अंडरवर्ड डॉन दाउद याचे व्याही जावेद मियादाद याला मातोश्रीवर बोलावून त्याचा पाहुणचार करणाऱ्या हिंदूहृद्यसम्राट बाळ ठाकरे यांच्या आत्म्याला गुलाम अली साहेबांची बातमी ऐकून प्रचंड वेदना झाल्या असणार.सहाजिकच(प्रचंड प्रश्नचिन्ह).

आदेश बांदेकर नामक भावोजी याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, हे साहेब देखील एक स्वयंघोषित कलाकार आहेत जे पैठणी साड्या उभ्या महाराष्ट्रातील महिला वर्गाला देत फिरतात. त्यांच्या एकाही कार्यक्रमात अजूनपर्यंत मुस्लिम महिला आपण पहिली नसेल, एवढेच कशाला सिद्धार्थनगर, कांबळेवस्ती किंवा राजवाड्यातील एकही महिला अजून या मंचावर ह्या महाशयांनी आणलेली नाही. ते कलाकार जरी असले तरी त्यांच्या पक्षाची हुजरेगिरी आणि जोहारकी करणारे हे उत्तम कलाकार आहेत. कलाकार या साधनेच्या कुठेही आसपास न फिरणारे हे व्यक्तिमत्व लवकरच आमदारकीसाठी पात्र ठरतील अशी चिन्हे आहेत. सहाजिकच. पण त्याने गुलाम अली साहेबांच्या कलाकारीवर फरक पडत नसतो, भारतीय जाणकार रसिक त्यांना या अगोदरही ऐकत होते आणि यापुढेही ऐकत राहणार.सहाजिकच. बाकी वाघाची डरकाळी आता गाईच्या हंबरण्यात रुपांतरीत झाली आहे याकडे लक्ष असावे.आपले लक्ष असेलच.सहाजिकच.