FTII ची मुले शेवटी बोललीच! राजकारणापुरत भगवा ठीक आहे हो, पण शिक्षण-कला क्षेत्रात भगवीकरण नामंजूर. जिथे येणाऱ्या काळातील रंगकर्मी घडणार आहेत, तिथे आरएसएसचा अजेंडा राबविन्याचा अच्छे दिन वाल्या सरकारचा मनसूबा विद्यार्थ्यांनी धुळीस मिळविण्याचा विडा उचलला आहे. गजेंद्रसिंग चौहान यांची संचालक म्हणुन नियुक्ति यनिमित्ताने वादग्रस्त ठरली. त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात गेले काही दिवस पुण्याच्या FTII मधे विद्यार्थ्यांनी आंदोलन करून, इंस्टिट्यूट बंद पाडलय. लक्षात घ्या, ह्याच मुलांनी अच्छे दिनला भुलुन भाजप सरकारला मतदान केल होत. तीच मुले आता भाजपच्या कुटनीतिला ओळखून त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहेत. ही खरी परिवर्तनाला सुरुवात आहे असे मानायला हरकत नाही.मागे चित्रपट सेंसोर बोर्डाच्या लीला सैमसन यांनाही आपल्या पदापासून सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे फारकत घ्यावी लागली होती. या प्रकारणावरून तेव्हाच अधोरेखित झाले होते की, आता कला, चित्रपट, संगीत क्षेत्राचे हिंदुत्विकरण चालु होणार. आहिस्ते आहिस्ते भाजप हे सगळे करत आहे.कला क्षेत्रात त्यांना फार रस आहे असेही समजन्याचे कारण नाही. पथनाट्य करुण समाजजागृति करणाऱ्या सफदर हश्मीला भर रस्त्यात मारणाऱ्या कांग्रेस मानसिकतेत आणि भाजप मानसिकतेमधे थोड़ा काय तो फरक. आपल्या मार्जितली लोक प्रत्येक सरकारला आवडतात, पण तेच लोक डोइजड झाल्यास त्यांना ठेचून काढण्यासही ह्या शक्ति मागेपुढे पाहत नाहीत. समाजप्रबोधनचि चळवळ गाण्यातून चालविणाऱ्या कलाकरांना इथली व्यवस्था कशी वागविते हे महाराष्ट्राला वेगळे सांगावयास नको.गाणे गाणारे लोक आणि विचार गाणारे लोक यांच्यात नेमका फरक कसा करावा हे समकालीन सरकारकडून शिकावे.असो, एकटे गजेंद्र चव्हाण यांना विरोध नाही, त्यांच्यासोबत असलेले नरेंद्र पाठक हे महाराष्ट्र अभाविपचे माजी अध्यक्ष राहिलेली व्यक्ति आहे. सोबतच, संघ परिवारातील संस्कार भारती या कला विभागाच्या पदाधिकारी राहिलेल्या प्रांजल सैकिया या देखील संघ मानसिकता घेवुन येतील यात शंका नाही. अनघा घैसास, राहुल सोलपुरकर अशी हिंदुत्ववादी मंडळी संचालकपदी येणार म्हटल्यावर पुढे काय वाढून ठेवले असणार याची कल्पना केलेली बरी! अशाही परिस्थितीत बरे झाले युवक बोलायला लागले, ज्यांच्या उर्जेचे भांडवल करुन जे भांडवालदार सत्तेत आले आहेत त्यांना ठिकानावर आणण्यासाठी या युवकांना पाठिंबा हा दिलाच पाहिजे!
अशोक भार्गव एका ठिकाणी फार छान सांगतात,
युग की जड़ता के खिलाफ, एक इंकलाब है,
हिंद के जवानों का एक सुनहरा ख्वाब है,
भारतीय सांस्कृतिक क्रांति,
मानवीय सांस्कृतिक क्रान्ति।।
भारतीय सांस्कृतिक क्रांति ही मानवीय आधारावर व्हावी हाच अट्टहास!
जिंदाबाद !!!
इंजि. सागर भालेराव
9595842238
Chan lihalay sagar. .. keep it up
ReplyDeleteयोग्य निरिक्षण सागरजी .
ReplyDelete