प्रसिद्धिमाध्यमे जन्माला आली आणि चळवळीची भाषा अनेकांगाने बदलली. कार्यकर्ता पत्रकारिता करण्यापेक्षा पत्रकारितेतला कार्यकर्ता होण्याची कित्येक लोकांनी स्वप्ने पाहिली. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि समाजवादाची व्याख्या माध्यमांच्या माध्यमातून कुठल्याही भांडवलदाराची मध्यस्ती न करता सांगण्याचा प्रयत्न करण्यात फार कमी पत्रकार यशस्वी झाले. आ. कपिल पाटिल, विवेक पंडित, निखिल वागळे हे त्यापैकीच् काही नावे. या सगळ्यांनी उत्तरार्धात वेगवेगळी क्षेत्रे निवडली. पैकी निखिल वागळे अजूनही पत्रकारितेतिल एक धारदार नाव म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आहे. वागळे म्हटले की आक्रमक पत्रकार अशी छबी तयार झाली. आक्रमक असताना आपली मांडणी कालसुसंगत आणि संदर्भासहित असावी असा कायम प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. ज्या बिनभिंतीच्या शाळेत त्यांची जडणघडन झाली त्याचे हे द्योतक! खोटा मुद्दा रेटून नेणाऱ्याला उघडा नागड़ा करण्याचे कसब वागळे सरांना चांगले जमते. म्हणून तर जितका त्यांचा चाहता वर्ग या महाराष्ट्रात आहे तेवढाच मोठा विरोधक वर्गहि आहे,आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार हे विरोधक आपले तोंड वर काढत असतात हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे.
शिवसेना ही त्यापैकीच् एक विरोधक. प्रचंड भावनिक असलेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष! आवाज कुणाचा म्हटल की यांचाच! मग वेळ सुसंगतपणा, भान, आकलन त्यात आहे किंवा काय याचे काही घेणेदेने यांच्या कार्यकर्त्यांना नसते.म्हणून तर वागळे सर IBN लोकमतला असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. वागळे सरांना धाक बसन्यापेक्षा त्यांच्यातील निडर पत्रकारिता आणखी जोमाने चालु राहिली. पत्रकारितेच्या माध्यमातून संविधानाची बीजे समाजात पेरती करण्याचा प्रयत्न आजवर वागळे सर करत आले आहेत. भंडावलदारी व्यवस्थेला कायम विरोध करणारे वागळे वेळेवर नोकरिवरही लाथ मारतात तेव्हा या अवलीयाची भुमिका स्पष्टपणे जाणवते. तोड़देखले फुले-शाहु-आंबेडकरांचा वारसा जपणारे अनेक पत्रकार आपल्या आजुबाजूला आहेत, परंतु निखिल वागळे म्हणजे अजब रसायन!
आपले म्हणणे कुणी ऐकत नाही असे दिसल्यास समोरच्या व्यक्तीला बदनाम करण्याची जुनी परंपरा आपल्याला आहे.वागळे सरांच्या वैयक्तिक आयुष्यवारही खुलेआमपणे पोस्टरबाजी करत प्रश्न उपस्थित केले गेले.आजही या घानेरड्या परंपरेचे आपण पाईक आहोत हे सांगताना खेद वाटावा. काल परवा अशीच एक ऑडियो क्लिप व्हाट्स एप्प वर फिरत होती. कुणी अनिरुद्ध 'जोशी' आणि वागळे सर यांच्यातील तो संवाद होता.त्यात वागळे सर आपली भूमिका ठनकावुन सांगतात. इथल्या सामाजिक व्यवस्थेने जी काही पेरले आहे त्याला विरोध करण्याचा प्रयत्न आजतागायत वागळे करत आले आहेत आणि तेच त्यांच्या या संभाषणावरून लक्षात यावे.सर्व ब्राम्हण वाईट असे स्वतः वागळे सर सुद्धा मानत नाहीत. तेव्हा वाईट प्रवृत्ती,मूलतत्ववाद घातकच हेच वागळे सर सांगतात.पुरोगामी चळवळीतील लोक ब्राम्हण आणि ब्राम्हणत्व यातील फरक जाणतात.मानसिक गुलाम तयार करण्यासाठीची पोषक मूल्ये समाजात रुजविण्याचा जो प्रयत्न इथल्या ब्राम्हण्यत्व असलेल्या व्यवस्थेने केला त्याला विरोध अगदी महात्मा फुले, पेरियार स्वामी, आंबेडकर आदी महापुरुषांनी केलेला आहे. फुले, आंबेडकर हायजैक करताना त्यांचा ब्राम्हणविरोध पद्धतशीरपणे हे 'समरसता' करायला निघालेले लोक विसरतात याचे नवल वाटावे! अगदी लांब जायला नको, आपले पंतप्रधान मोदीजी ह्यांना देखील सनातनी वृत्तिचे म्हणून टीकेचे धनी व्हावे लागते, मोदी काही ब्राम्हण नाही, मुख्तार अब्बास नकवी काय जानवे घालुन पौराहित्य करत नाही, हे लक्षात घेतले तर नेमके ब्राम्हण आणि ब्राम्हणयत्व यातील फरक स्पष्ट होईल. एका रुपकार्थाने याचा विचार केला तर मुलतत्ववादी असलेले ओवेसी बंधु देखील ब्राम्हण्यत्व सांगत असून दूसरे काहीही सांगत नाही, येणाऱ्या काळात ही प्रतिमा अनिरुद्ध जोशी सारखे परपोषी मानसिकता असलेली ब्राम्हण मंडळीच् खरी करुण दाखवतील. झाल्या प्रकाराने वागळे काही गप्प बसणाऱ्यांमधले नाही. विद्रोह हां ज्याचा स्थायीभाव आहे तो थांबेल थोडेच! विवेकवादी आहोत, विचारांची लढाई विचारांनी करणार. संविधानावरची श्रद्धा कायम आहे. माझ्यासारख्या पत्रकारितेत नविन असलेल्या कित्येक तरुणांचा आदर्श असलेले वागळे कायम स्फूर्ति देत राहतील. विवेकवादाचा पुरस्कार करणारे आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत!
लड़ेंगे-जीतेंगे!
इंजि. सागर भालेराव
9595842238
खुपच योग्य मांडणी सागरजी .
ReplyDelete