मार्क्सवाद आणि भारतीय समाज.(Communication Theory)

   


  मार्क्सवाद आणि साम्यवादाबद्दल आजकाल भरपूर काही बोललं जातंय.भारतीय समाजाला मार्क्सवाद नाही तर लोकशाही प्रणित क्रांती अपेक्षित आहे असा एक सुर सध्या आळवला जातो आहे.परंतु "दास कॅपिटल" या आपल्या ग्रंथात जेव्हा कार्ल मार्क्स कामगारांच्या आणि शोषितांच्या बाजुने बोलतो तेव्हा त्याच्या जाणीवा त्यात व्यक्त होतात,रशियाच्या पाश्वर्यभूमीवर  आणि साम्यवादी चळवळीतून निर्माण झालेला हा लढा भारताच्या दृष्टीकोनातून पहिला तर त्याची तत्वे पूर्णपणे इथे लागू होत नाही.श्रमिक आणि भांडवलदारांच्या विरुद्धचा लढा आपण आता आता सुरु केलेला आहे.उदारीकरणानंतर आणि जागतिकीकरणानंतर आपल्या समाजात झालेला बदल आणि त्या बदलामागची कारणे मार्क्सच्या नजरेतुन समजुन घेणे सध्या गरजेचे वाटते आहे.सशस्र क्रांतीचा मार्क्सला अपेक्षित असलेला लढा आपण उभारू शकत नाही पण लोकशाही मार्गाने हि समस्या आपण नक्कीच सोडऊ शकतो.बुद्धाची करुणा जेवढी भारतीय समाजाला आपली ओळख वाटते,तेवढीच न्याय्य भूमिकासुद्धा आपली संस्कृती आहे हे विसरता कामा नये.धर्माला अफूची गोळी मानणारा मार्क्स भारतीय तरुणांना का आपलासा वाटतो ? याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.नक्षलवादी चळवळीविषयी आपण भरपूर बोलतो पण त्याच्या मुळाशी जाण्याचे आपण साफपणे नाकारतो.आपलाच समाजघटक असलेला काही अल्पसंख्यांक समुदाय का स्वतःला अजूनही या व्यवस्थेपासून अलिप्त ठेवतो आहे, याबद्दल चर्चा करणे सामाजिक विचारवंतांकडून अपेक्षित आहे .पण बहुमताला पटणारा मुद्दा अल्पमताला किंमत देत नाही म्हणुन त्यांचे विचारच नाकारणे जसे मार्क्सला योग्य वाटत नाही तसेच लोकशाही तत्वे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला सुद्धा नकोशा वाटतात.त्यामुळे संवादाच्या माध्यमातून विषमतेचा,भांडवलशाहीचा आणि वर्गाव्यवस्थेचा हा प्रश्न कसा सुटू शकतो याबद्दल विचार आणि कार्य करणे हे आपल्यासमोरची आव्हाने असणार आहेत.

 इंजि.सागर भालेराव.

3 comments:

  1. मी तुझ्या मताशी काहीसा सहमत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. कोणत्या गोष्टीबद्दल सहामत नाहीस??

      Delete
  2. छान......पन आनकीन माहिती ची गरज

    ReplyDelete