प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!

प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!


     एका सर्वेक्षणावरून प्रामाणिकतेच्या बाबतीत मुंबई शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याच निष्पन्न झालं आहे.खर तर आजच्या युगात प्रामाणिकपणाची वानवा सतावत असताना मुंबई मात्र आपली ओळख बनवते हे येथे उल्लेखनीय! आजवर मुंबईने अनेक सुख-दु:खे पाहीली,लक्ष्मी आणि अवदसा इथे हातात हात घालून चालतात,अंडरवर्डचा बादशाह इथल्याच गल्ली-बोळात घडतो-बिघडतो,दहशतवादाची अनेक पाशवी कृत्ये इथला समाज  झेलतो,गोलपिठा,कामाठीपुऱ्याच भयाण वास्तव इथली मुंबई जगते.या सगळ्या जाणिवेच्या प्रवासातून आजवर मुंबई घडली आहे.तरीही संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रच प्रतिबिंब एकट्या मुंबई नगरीत पाहायला मिळत.
     पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यातून आलेला कामगार सुद्धा मग अल्पावधीतच मग मुंबईकर होतो.त्याला जातीपातीच,धर्माचं कुठलंच लेबल वापरायची गरज पडत नसते.कारण यंत्रवत चालणाऱ्या या शहराने या लेबल्सला केव्हाच अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे.सामाजिक समरसतेतून  एकमेकांना मदत करायचा हा इथल्या नागरिकांचा स्थायी भाव! एखाद्या भांडखोर घरामध्ये प्राणांतिक प्रसंग घडून गेल्यावर जसा एकोपा निर्माण होतो,तसाच आपुलकीचा जिव्हाळा बॉम्बस्फोटानंतर इथल्या सामान्य माणसांमध्ये निर्माण झाला.यंत्रवत चालणारी व्यवस्था आता हळूहळू कुटुंबासारखी होऊ पाहते आहे.त्यामुळेच,रिक्षामध्ये ५० लाख रुपये विसरून गेलेल्या प्रवाश्याला रिक्षाचालक ते परत करतो आणि किलोभर सोन  सापडून सुद्धा एखादा प्रामाणिक मुंबईकर त्याच्या मालकाला ते पुन्हा देतो,हे प्रामाणिकपणाच लक्षण असणारी "सोन्या"सारखी माणसे क्वचितच इतर ठिकाणी सापडावीत!
     २ महिन्यापूर्वी मी पत्रकारितेच्या अभ्यासासाठी मुंबई गाठलं,या दोनच महिन्यात इथल्या गर्दीशी आणि वातावरणाशी समरूप झालो.प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या या नगरी बद्दल स्वतः  अनुभव घेतला.तिच्या प्रामाणिकते बद्दल शंका घेण्याच कारण नाही,यंत्रांची,तंत्रांची,तल्लम साडीची हि मुंबापुरी शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यातून आजकाल रोज भेटते आहे.ह्या मायानगरीचा उत्कर्ष असाच वाढत जावा ही अपेक्षा!!

इंजि.सागर भालेराव.
              

2 comments:

  1. mumbaapuri hi nagrich nyari aahe....hi pratyek mumbaikarala jagavte aani swatahi pratyekasarkhi jagte...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणून तर मुंबई देशाची जान आहे.

      Delete