फाशी झाली आता पुढे काय??? (communication theory)

वर्षभराच्या आत निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या देशात न्यायप्रक्रिया किचकट जरी असली तरी लोकशाही मानणाऱ्यांना ती सर्वोच्च संस्था वाटते.आजवर अनेक बलात्काराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आल्या आहे आणि घडत आहेत.(भविष्यात घडू नये हि अपेक्षा!) निर्भया प्रकरणानंतर सगळा देश हळहळला होता आणि संपूर्ण देशात न्याय मागण्यासाठी तरुणांनी लढा उभारला  होता.त्या दबावामुळे खर तर द्रुतगती न्यायालयाची स्थापना केली गेली.झाल्या प्रकारानंतर तरुणाई रस्त्यावर उतरली,त्यांच्यातील संवादाच     माध्यम  सोशल मिडिया होत.फेसबुक,ट्विटर च्या माध्यमातून तरुणायीने आपले विचार मांडले आणि बघता बघता लाखोचा समुदाय विजय चौकात निदर्शने करताना,अश्रुधुराचा मारा खाताना,लाठीमार खाताना दिसला.न्यायासाठी ज्या पद्धतीने हा समुदाय लढला त्याच पद्धतीने त्याने पुढे सुद्धा वागायला हव.मेणबत्ती मोर्चे काढून हा प्रश्न संपणारा नाही.पुरुषप्रधान,स्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या आपल्या समाजात समानतेची शिकवण देणारा नवा अध्याय नव्या माध्यमातून आपल्याला सुरु करावा लागणार  आहे. निर्भायाला न्याय मिळाला पण अजूनही सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे यांच्यासारख्या दुर्गम भागातील स्रियांना न्याय अजून मिळायचा आहे. त्यांच्यासाठी कुणीही मेणबत्ती मोर्चे काढलेले नाही,किंवा कोणताही मिडिया त्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही.या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करावा लागणार आहे.कायदा झाला म्हणून स्रीयांवरचे अत्याचार कमी होणार नाहीत पण झालेल्या कायद्याची परिभाषा सामान्य नागरिकांना कळेल यासाठी आपण युवकांना  प्रयत्न करावे लागणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या गोष्टी सामान्य नागरिकांना सांगायला हव्यात.या घटना पुढे घडणार नाहीत आणि उपेक्षितांना न्याय मिळेल हि अपेक्षा!      

1 comment:

  1. bramhani media aahe te kashala bhutmange kutumbiyanchi news dakhavtil... delhi yethe ghadleli ghatana hi uchhabhru lokamadhil ghatana hoti mhnun yacha nikal lvkr lagala aani ek dalit mulivar balatkar hovo na tyanchi jivant dhindh kadhun maro ya bramhani media la ani ya sarkar la kahich padalel nahi... ya bramhani media cha ani sarakaracha nishedh...

    ReplyDelete