दुष्काळ दिवाळी

या वर्षी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवल की यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत साजरी करावी.त्यादृष्टीने मग नियोजन सुरु झाले.यंदा पाऊस नाही म्हणुन नापिकी,आणि त्यामुळे बळीराजाचि दयनीय अवस्था.पण ज्याच्या राबन्यावर जनता जगते, जग जगते त्याच्या संकटसमयी जर आपण त्यांच्यासोबत उभे नसु तर आपल्यासारखे करंटे आपणच.
मग दुष्कलग्रस्त जिल्ह्यात छात्रभारतीचे पुणे,नगर,मुंबई, बार्शी, नाशिक टिमचे कार्यकर्ते पोहोचले.सुरुवात झाली उस्मानाबाद जिल्ह्यापासून. दुष्काळ जाहिर करायला मायबाप सरकारला एक महीना उशीर झाला,त्यामुळे पाणी आणि धान्य टंचाई सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळते. अगोदर 4 नोव्हेंबरला परांडा तालुक्याच्या गावी गेलो.तालुक्यांच् गाव असल तरी परिस्थिति फार काही चांगली नाही. परांडा हां तिथल्या किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहेच पण यंदा तिथल्या दुष्कालामुळे प्रसिद्धित आहे. 3 रूपये प्रति हंडा दराने येथे पाणी विकले जाते. खाजगी बोर,सायपन असलेले सुखवस्तु शेतकरी हा धंदा करतात.विकतचे पाणी घ्यायला गावकर्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी देखील पिवळे धमक!

त्याच संध्याकाळी परांडा शहरापासून 15 किमी असलेल्या ढगपींपरी गावाला भेट दिली.इथे तर दुष्काळ ढग होऊन कोसळलाय.400-500 लोकवस्तीच हे गाव. गावात प्राथमिक शाळा आहे, खेड़े या पारंपरिक कल्पनेत असलेल्या प्रतिमेशी अगदी तंतोतंत् जुळणारे हे गाव. गावात भायाण दुष्काळ। तिथे कार्यकर्त्यांनी शेतकार्यांशी संवाद साधला. एक पथनाट्य सादर केले. चिमुरड्या मुलांसाठी आनलेला खाऊ देण्यात आला. त्यानंतर त्या गावात एका शेतकऱ्याने 20 ऑक्टोबर 2015 ला आत्महत्या केलि होती त्या घरी पोहोचलो.महादेव कोथमिरे हे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्र्य.इंदिरा आवास योजने अन्तर्गत बांधलेले हे झोपड़ीवजा घर. महादेव कोथमिरे यांना केवळ अर्धा एकर जमीन,म्हणजे हे अत्यल्प भूधारक! गेल्या तीन वर्षापासून शेतीतून काहीही उत्पन्न नव्हते.कर्जबाजारी होऊन शेवटी शेजारच्या गावात सालगड़ी म्हणुन काम घेतले.वयाच्या 15 वर्षीच् लग्न होऊन गेलेली मुलगी, दूसरी हाताने अपंग असलेली नववीला जाणारी मुलगी. चौथी इयत्तेत शिकनारा मुलगा आणि पत्नी, असा हा प्रपंच। कुटुंबाची होणारी परवड पाहून ज्या शेतात सालाने काम करत होता,तेथेच चिंचाच्या झाडाला फास घेवून महादेव कोथमिरेने गळफास घेतला.बळीचा आणखी एक वंशज इथे संपला.दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेबांना पीड़ित कुटुंबासोबत भेटलो. तहसीलदार साहेब कसल्या त्या मिटिंगमधे व्यस्त होते, 15 दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी असे सर्वाधिकार तहसीलदरांना असतानाही केवळ शासकीय दिरंगाइ, मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली आहे असे सांगून तहसीदार यांच्याकडून वेळ मरण्यात आली.
यावरून सरकार दुष्कालग्रस्त लोकांबाबत कीती उदासीन आहे हे पाहायला मिळाले.
दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबरला वांगी बुद्रुक या गावी गेलो.तिथे देखील सारखीच परिस्थिति थोड्याबहुत फरकाने. इथे देखील शेतकरी, शाळेत जाणारे मुले यांच्याशी संवाद साधला. या गावात देखील एका शेतकरी महिलेने स्वतःला जाळून घेतले.इतकी भयानक परिस्थिति असताना सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष अतीव निंदनीय असे आहे.
पुढे नलदुर्ग, लातूर असा दौरा केला. स्वाति पीटले या ज्या मुलीने बस पाससाठी पैसे नाही म्हणुन आत्महत्या केली, तिच्या घरी देखील भेट दिली. गावातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींशी संवाद साधला.आपल्याआपल्या परीने धीर देण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती भयानक आहे,एकीकडे दिवाळीचे आकाश कंदील पेटत असताना इकडे दुष्कालामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे पेटत आहेत याचीही दखल घेतली जावी.
जायाकवाडीला पाणी देणार नाही पण आमचे एक्वा प्लांट देखील बंद करणार नाही अशी दुटप्पी
भूमिका घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील साखरसम्राट पुढऱ्यांना ढगपींपरी आणि वांगी बुद्रुक गावात नेवुन सोडले पाहिजे. विरोधी पक्षातील लोक देखील या प्रश्नाबाबत अतिशय उदासीन आहेत.
शेतकरी राजा मात्र हवालदिल आहे, परिस्थिति बदलली पाहिजे नाही तर अराजकता आल्याशिवाय राहणार नाही।

No comments:

Post a Comment