मोदींसमोर पत्रकार राजकमल झा यांनी केलेलं चर्चित भाषण.

बुधवारी नवी दिल्लीत पत्रकारितेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'रामनाथ गोयंका पुरस्काराचे वितरण केले गेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले गेले.मोदी सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या पत्रकारांना देखील या कार्यक्रमात मोदींना पुरस्काराने सन्मानित करावे लागले. पत्रकार आणि लेखक म्हणून नावाजलेले अक्षय मुकुल यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु या कार्यक्रमाला न येणे त्यांनी पसंद केले आणि कारण सांगितले कि  मोदींच्या सोबत एकाच 'फ्रेम' मध्ये येणे आवडणार नाही!

अक्षय मुकुल यांच्या या भूमिकेपेक्षा अधिक चर्चा झाली ती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना राजकमल झा यांनी केलेल्या भाषणाची. राजकमल झा हे गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक आहेत. अक्षय मुकुल यांच्या प्रमाणे कार्यक्रमापासून दूर राहण्या ऐवजी संवादाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या आभार प्रदर्शन भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेतच,सोबतच मोदींच्या समोर त्यांनी व्यक्त केलेली भूमिका सरकारला आणि पत्रकारिता जगताला ठिकाणावर आणणारी आहे. त्यांच्या भाषणाचा हा मराठी अनुवाद.
प्रधानमंत्री मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे पत्रकार आणि स्वतः मोदीजी 



राजकमल झा, हे मोदींच्या भाषणानंतर विचारपीठावर आले आणि बोलायला लागले...

खूप खूप धन्यवाद प्रधानमंत्री मोदीजी.
तुमच्या 'स्पीच' नंतर आम्ही सगळे 'स्पीचलेस' झालो आहोत.परंतु मला आभार मानताना आणखी काही बोलायचे आहे.तुमच्या शब्दांसाठी आभार.तुमचे येथे असणे म्हणजे एक मजबूत संदेश आहे.आम्ही विश्वास व्यक्त करतो कि चांगली पत्रकारिता ही अशा कामांमुळे चर्चिली जावी ज्या कारणामुळे इथे आजच्या संध्याकाळी  पत्रकारांना आणि संपादकांना सन्मानित केले गेले आहे.

चांगली पत्रकारिता काय असते हे 'सेल्फी पत्रकार' ठरवणार नाहीत. ही सेल्फी पत्रकारिता करताना आजकाल आपल्याला अनेकजण दिसतील.हे लोक त्यांचे 'चेहरे' आणि 'विचार' यांत अंतर ठेवतात, कॅमेराचे तोंड हे लोक कायम स्वतःकडे ठेवतात.त्यांच्या दृष्टीने एकच गोष्ट महत्वाची असते, त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा.याशिवाज जे काही आहे ते सगळे इथल्या भूमीत आहे.जसे कि विनाकारण केलेला गोंगाट! या सेल्फी पत्रकारितेत तुमच्याकडे काही तथ्य नसले तरी हरकत नाही, फ्रेम मध्ये केवळ एखादा झेंडा असायला हवा, आणि तुम्ही त्या झेंड्यामागे लपा!

धन्यवाद सर, तुम्ही विश्वसनीयता बद्दल बोललात.ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यातून आम्ही पत्रकार काही शिकू शकतो. तुम्ही पत्रकारांबद्दल काही चांगल्या-चांगल्या गोष्टी देखील बोललात, त्याबद्दल आम्ही थोडे नर्वस आहोत.

तुम्हाला ही गोष्ट  विकिपीडियावर मिळणार नाही,परंतु मी इंडियन एक्सप्रेसच्या संपादक पदावर असल्याकारणाने सांगू शकतो कि, रामनाथ गोयंका यांनी एका पत्रकाराला नोकरीवरून काढले होते. याचे कारण होते, कि कोणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले कि, तुमचा पत्रकार खूप छान काम करतो आहे.
या वर्षी मो 50 वर्षांचा होणार आहे, तेव्हा मी हे सांगू शकतो कि आजच्या काळात आपल्याकडे असे पत्रकार आहेत जे रिट्विट आणि लाईक्स च्या युगात तरुण होत आहेत, ज्यांना माहित नाही  कि सरकारकडून आपली केली जाणारी निंदा आपल्यासाठी खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.
आपण जेव्हा कधी कुना पत्रकारची स्तुती ऐकू तेव्हा, ज्यापद्धतीने चित्रपटात स्मोकिंग सीनच्या दरम्यान स्क्रीनवर खबरदारीचा उपाय म्हणून पट्टी चालते, त्यापद्धतीने आपण देखील एक पट्टी चालवायला हवी कि, सरकारतर्फे केली जाणारी आलोचना पत्रकारितेसाठी शानदार खबर आहे. मला वाटते कि ही गोष्ट पत्रकारितेसाठी खूप खूप महत्वाची आहे.

आभारप्रदर्शन भाषण करताना गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक राजकमल झा.

या वर्षी आमच्याकडे या पुरस्कारासाठी 562 निवेदने आली.गेल्या 11 वर्षातील ही सगळ्यात जास्त निवेदने आहेत.हे त्या लोकांना उत्तर आहे ज्यांना वाटते कि चांगली पत्रकारिता आता उरली नाही आणि सरकारने पत्रकारांना विकत घेतले आहे. चांगली पत्रकारिता मेलेली नाही,मरत नाही.उलट अशी पत्रकारिता वाढते आहे, बहरते आहे.एक वाईट गोष्ट मात्र ही आहे कि, खोटी पत्रकारिता सध्या मोठ्या प्रमाणात गोंगाट करते आहे, गेल्या 5 वर्षात असे चित्र नव्हते.

शेवटी मी आजच्या संध्याकाळी येथे आलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद मानतो. इथे सत्तेत असलेले लोक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत.आपण सगळे जाणतो कि कोण कोण आहेत.परंतु ते जेव्हा पत्रकारितेची स्तुती करतात तेव्हा काही फरक पडत नाही.तुम्ही हे जाणून घेऊ शकत नाही कि कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे.हे अशाच पद्धतीने झाले पाहिजे.
खूप खूप धन्यवाद.



अनुवाद: सागर भालेराव

No comments:

Post a Comment